मुले आणि विविध स्क्रीन – डॉ. सागर मुंदडा

आजच्या जगात आपण बघतो की प्रत्येक घरात, प्रत्येक मुलाकडे टीव्ही, मोबाईल, टॅबलेट, उपलब्ध झाले आहे. घरात शौचालय नसेल पण मोबाईल नक्की असतो. सोशल मिडिया स्वरूपी लाटेमध्ये जणु काही आपण सगळे वाहून जात आहोत. पालक आपल्या मुलांना खूप अगोदर म्हणजे अगदी लहानपणीच मोबाईल हातात देतात‧ ज्या वयात त्यांना धड चालताही येत नसते अशा वयात त्यांच्या हातात […]

आदिविनायक

आपल्याकडे गणपती हे दैवत इतके लोकप्रिय आहे की, त्याच्या प्रत्येक क्षेत्राबद्दल, स्थानाबद्दल काही ना काही कथा, कोणता ना कोणता तरी विशिष्ट आचार, प्रथा रूढ झालेली दिसते. आता हेच पाहाना. दक्षिणेत रामेश्र्वरपुरम् या शहराच्या ईशान्येला साधारण २० मैलांवर गणपतीचे एक देऊळ आहे. त्याचे तिथले नाव आहे वेय्यिगुलनाथ. श्रीरामाने सेतू बांधण्यापूर्वी ज्याची पूजा केली तोच हा विनायक. […]

आंबा | King of Fruits | Mango | Mango Lover

फळांचा राजा | ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

आंबा हा फळांचा राजा आहे, असे म्हणतात. इतका सर्वप्रिय, सर्वार्थांनी मधुमधुर असा दुसरा कोणता ‘राजा’ भूतलावर असेल असे वाटत नाही. आंबा सर्वांना आवडतो. त्यामुळे यंदा आंबा रुसला या बातमीनेच बहुसंख्य लोक हिरमुसले झाले. ​आपल्या समर्थ रामदासस्वामींनाही आंबा फार आवडायचा. खरे म्हणजे ते कमालीचे विरक्त. पण आहारामध्ये चोखंदळ होते. पण त्या चोखंदळपणाचा आपल्या आत्मिक उन्नतीत अडथळा […]

स्वयंपाकघरातील औषधी रत्ने…

आयुर्वेद, आजीबाईचा बटवा, औषधी आहार अशा अनेक प्रकारे आजपर्यंत अनेक वेळा आयुर्वेदाची व्यवहार्यता लोकांच्या पाहण्यात, वाचनात येत आहे. त्यामुळे या विषयाचे महत्त्व पटवून देण्यात वेळ आणि शब्द वाया न घालवता सरळ मुख्य मुद्यावर येऊया. ​स्वयंपाकघरात असलेल्या पदार्थांचा, स्वस्थ व्यक्तींसाठी तसेच अनेक रोग किंवा लक्षणांमध्ये कशा प्रकारे वापर केला जाऊ शकतो हे पाहूया. ​१. दालचिनी – […]

महाराष्ट्राच्या विकासाची नवी शक्तिस्थाने – माधव चितळे

समाजाचा ऐहिक विकास हा नैसर्गिक परिस्थितीची अनुकूलता,सामाजिक व्यवहारांची सुदृढ बांधणी, समाजाच्या हाती असलेले तंत्र-विज्ञान आणि आर्थिक शक्ती या चार घटकांच्या परस्पर पूरक अशा एकत्रित बांधणीवर अवलंबून असतो. या प्रत्येक घटकाची स्थनिक वैशिष्टे नीट माहिती असणे, त्यांच्या मर्यादा लक्षात येणे, त्यांच्यात कोठे, किती व कशी भरघालता येईल याबद्दलचा सामाजिक टक्का विवेक असणे यावर प्रगतीची दिशा ठरते. […]

मराठी भाषेचे राज्य

१५ ऑगस्ट, १९४७ या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यापूर्व काळात असलेली भारत-देशाची प्रांतरचना ही निश्चित योजना आखून केलेली नव्हती. भाषावर प्रांतरचनेचा आग्रह स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू होता. स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर दहा-बारा वर्षांनी जी भाषावार प्रांतरचना झाली, त्यात महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांचे व्दिभाषिक राज्य झाले. पुढे त्या व्दिभाषिक राज्याला सगळीकडून विरोध झाल्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात […]

या देवी सर्वभूतेषु ‘निद्रा’ रूपेण संस्थिता

कोणतीही गोष्ट सहज मिळाली,की त्याची किंमत माणसाला कळत नाही आणि जेव्हा तीच गोष्ट मिळेनाशी होते, तेव्हा तिचे महत्त्व समजू लागते.झोपेच्या बाबतीतही तेच दिसून येते.मात्र झोप ही आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे.आरोग्यसंपन्न जीवनाचे जे तीन आधार आयुर्वेदात सांगितले आहेत, त्यात झोपेचा समावेश आहे. यावरूनच झोपेचे महत्त्व लक्षात येऊ शकते.झोप म्हणजे आपल्या शरीराला पुन्हा पुन्हा प्राह्रश्वत होणारी […]

गुणसंपन्न दही

दररोज आपल्या आहारातून एक वाटी ताजे दही घेतल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते. दह्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते, तसेच डोके शांत राहण्यास मदत होते. ताकामुळे अन्नपचनास मदत होते. आरोग्याबरोबरच सौंदर्यासाठी दही उपयुक्त आहे. एक ग्लास ताक घेऊन त्यात मुलतानी माती मिसळा. या मिश्रणाने केस धुतल्यास केस निरोगी, दाट होतात. केसांत कोंडा झाला असल्यास एक कप दही घेऊन […]

विजयी माझा श्रीहनुमान !

बलभीम मारुतीचे वैशिष्ट्य काय? एक महत्त्वाची गोष्ट अशी की, मारुती कधीही पराभूत झालेला नाही. अवघड प्रसंगी त्याला आपल्या अंगच्या अद्भुत शक्तीची जाणीव होते आणि तो कोणत्याही बिकट प्रसंगातून सहजपणे मार्ग काढतो. मध्वमुनीश्र्वरांनी मारुतीरायाच्या पराक्रमाचे वर्णन करणारे एक सुंदर पद लिहिले आहे. मध्वमुनीश्र्वरांच्या इतर रचनांप्रमाणेच हे पद्सुद्धा प्रासादिक आणि मधुर असे आहे. विजयी माझा श्रीहनुमान। अंजनीनंदन […]

वावड्यांच्या देशात…

२० सप्टेंबर १९९५ रोजी या महाराष्ट्र प्रांती अवघा चमत्कार घडला.अनेकांचे गणपती अचानक दूध पिऊ लागले.घरांमध्ये आणि देवालयांमध्येही हाच प्रकार.बरे, सामान्य नागरिकांप्रमाणेच मुख्यमंत्रीसाहेबही गणपतीच्या दूध- प्राशनाविषयी छातीठोकपणे सांगू लागल्यावर या बातमीवर जणू सरकारी शिक्कामोर्तबच झाले! खरे म्हणजे त्या काळात आजच्यासारखे मोबाइल फोनही नव्हते. पण तरी गणपती दूध पितो ही बातमी किंवा वावडी वाऱ्यासारखी सर्वदूर पसरली. सध्या […]