धर्म जागृती आणि देशभक्ती (समर्थ स्मरण : २)

समर्थांनी प्रभुरामचंद्र आणि महाबली हनुमान यांचा आदर्श लोकांसमोर ठेवला त्याच्यी सर्व कारणे आपल्याला या घडीला समजू शकली नाहीत. या  काळात राम आणि हनुमंताचा आदर्श हा आवश्यक होता एवढे आपण ठामपणे म्हणू शकतो,कारण रामाने देवांना रावणाच्या कैदेतून मुक्त केले. कर्तव्यपालनासाठी सर्व प्रकारच्या ऐहिक सुखांकडे पाठ फिरवून हा मर्यादापुरुषोत्तम विविध प्रकारचे कष्ट आनंदाने सोसत राहिला. समर्थांच्या काळात विलासी […]

समर्थ स्मरण १ आनंदाचा कंद , देवाचिये द्वारी

धर्मजागृतीतून स्वराज्य स्थापना (समर्थ स्मरण : १)

श्रीसमर्थ रामदासस्वामी हे आपल्या सगळ्या संतपरंपरेत त्यांच्या वेगळेपणामुळे उठून दिसतात. ज्या काळात महाराष्ट्र मोगलांच्या आक्रमणामुळे हतबल झाला होता. जनसामान्यांमध्ये लोकजागृतीची जाणीव करून देणे अत्यावश्यक होते, त्या काळात श्रीसमर्थांनी देश आणि धर्म याबद्दलचा अभिमान लोकमानसात चेतवला. वन्ही तो चेतवावा रे । चेतविताच चेततो । । हे आपलेच म्हणणे समर्थांनी प्रत्यक्ष कृतीने खरे करून दाखविले. समर्थांच्या आधीच्या […]