महाराष्ट्राच्या विकासाची नवी शक्तिस्थाने – माधव चितळे

समाजाचा ऐहिक विकास हा नैसर्गिक परिस्थितीची अनुकूलता,सामाजिक व्यवहारांची सुदृढ बांधणी, समाजाच्या हाती असलेले तंत्र-विज्ञान आणि आर्थिक शक्ती या चार घटकांच्या परस्पर पूरक अशा एकत्रित बांधणीवर अवलंबून असतो. या प्रत्येक घटकाची स्थनिक वैशिष्टे नीट माहिती असणे, त्यांच्या मर्यादा लक्षात येणे, त्यांच्यात कोठे, किती व कशी भरघालता येईल याबद्दलचा सामाजिक टक्का विवेक असणे यावर प्रगतीची दिशा ठरते. […]

आपला महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र

आपण मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर फिरायला जातो तेव्हा नेहमीच तिथे कचऱ्याचे ढिगारे पाहावयास मिळतात. सण-उत्सवाच्या पवित्र काळात तर या ढिगाऱ्यांमध्ये शतपटींनी वाढ झालेली दिसते. आपण निसर्गाच्या या सुंदर घटकाचा होत असलेला ऱ्हास पाहून मनात हळहळतो आणि पुढे निघून जातो. परंतु गेले एक वर्ष दादर येथील जय श्रृंगारपुरे हा एक तरुण या घाणीच्या साम्राज्यात पाय रोवून उभा […]